Thursday, June 7, 2012

Visit Web site - http://swamisamarth.in


|| श्री स्वामी समर्थ ||

श्री स्वामी समर्थ, अर्थात अक्कलकोट स्वामी हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील एक गुरू होते. ते दत्तसंप्रदायातील एक प्रमुख संत आणि श्रीपादवल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जातात.पण विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. इ.स. १८५६-इ.स. १८५७ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इ.स. १८७५ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना "सध्या लढायची वेळ नाही" असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास.. और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...
इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...
आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.
इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे. असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा.पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ महाराजांचे काही चरीत्र
 १. गुरुचरीत्र ( श्री दत्त महाराजांचे )
१. गुरुलिलामृत
२. चरीत्र सारामृत

त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र फार प्रभावी आहे.


!! “स्वामी समर्थ तारक मंत्र” !!


नि:शंक हो | निर्भय हो मना रे |

प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ||

अतॅ क्य अवधूत हे स्मरण गामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||

 जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय |
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||
आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला |
परलोकी ही ना भीती तयाला ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी || 2 ||

उगाची भीतोसी भय हे पळू दे |
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा |
नको घाबरू तू असे बाळ त्याचा ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी || 3 ||

खरा होई जागा | श्रद्धेसहित |
कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||
कितीदा दिला बोल त्यांनीच हात |
नको डगमगू | स्वामी देतील साथ ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी || 4 ||

विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ
स्वामीच या पंचप्राणामृतात ||
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |
न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी || 5 ||

  • कोणत्याही संकट आल्यास स्वामींचा हा अदभुत तारक मंत्र म्हणावा संकट दूर होतात *

No comments:

Post a Comment